(मुंबई) ९ जुलै २०२३ : उत्तर मध्य मुंबई लोकसभा क्षेत्राची महत्वाची बैठक कुर्ला येथे बिआरएस पार्टीचे कोकण मुंबई विभागीय समन्वयक प्रा. विजय मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मुंबई उपनगर जिल्हा समन्वयक संजय निंबाळकर यांच्या प्रयत्नाने यशस्वीरित्या पार पडली.
सभेत कोकण मुंबई विभागीय समन्वयक प्रा. विजय मोहिते यांनी आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने पक्षबांधणी द्वारे जास्तीत जास्त बिआरएस पार्टीचे लोकप्रतिनिधी निवडून यावेत आणि मुंबई महानगरपालिकेवर बिआरएस चा गुलाबी झेंडा यशस्वीरित्या फडकवता येईल असे प्रतिपादन केले.
मुंबईतील जनतेच्या स्थानिक मूलभूत गरजा भागविण्यासाठी नगरसेवक, आमदार, खासदार हे लोकप्रतिनिधी असफल होत असल्याची चिन्हे दिसताच त्यासोबतच जनतेचा लोकप्रतिनिधींच्या प्रती वाढता रोष ध्यानी घेतांच सर्वच पक्षांना महाराष्ट्राच्या जनतेचा विसर पडू लागल्याची चिन्हे या महाराष्ट्रात स्पष्टपणे दिसू लागली आहे.
इतर पक्षांची सत्तेची लालसा पाहता लोकप्रिनिधींना जनतेच्या मुलभूत समस्येबाबत काही देणेघेणे राहिलेच नाही. अनावश्यक मुद्द्यावर लोकांना गुरफटून ठेवून खोट्या आश्वासनाच्या आधारावर सत्तेत येऊन जनतेच्या टाळूवरचे लोणी खाण्यास इतर पक्षीय लोकप्रतिनिधी पुन्हा नव्याने सज्ज होणार हे नक्की !
महाराष्ट्रात बिआरएस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा तेलंगाणा राज्याचे मुख्यमंत्री के.चंद्रशेखर राव (KCR) यांनी तेलंगाणा कृषी मॉडेलद्वारे कल्याणकारी योजना राबविण्याचे धोरण अवलंब करताच महाराष्ट्रातला ६५% शेतकरी वर्गाला भुरळ पडली आहे. खेड्यात राबविला जाणारा विकासात्मक बिआरएस पक्षाचा अजेंडा पाहता शहरी भागात लोक जागृत होणे स्वाभाविक आहे.
जनता नवीन पर्याय शोधू पाहत असताना अचानक बिआरएस पक्षाची महाराष्ट्रात झालेली दमदार एंट्री महाराष्ट्रातील अनेक पक्षांच्या पायाखालची सरकणारी वाळू पाहता बिआरएस पार्टी विरोधी पक्षातील राजकारण्यांना कलाटणी देणारी ठरू शकते.