,
BRS ची महाराष्ट्रात पक्ष बांधणी जोरात सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून BRS अध्यक्ष व तेलंगणा मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यानी सहा विभागांसाठी 6 समन्वयक नेमले आहेत. मुंबई (कोकण) विभाग साठी प्रा विजय मोहिते यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी मुंबई प्रांतातिल विधानसभा मतदारसंघाच्या प्रतिनिधींची सभा देवराज हॉल दादर मुंबई येते आज दुपारी 2 वाजता आयोजित केली होती. महाराष्ट्रातील राजकारणात BRS चे आगमन झाल्यापासून खळबळ निर्माण झालेली आहे. अनेक पक्षातील प्रस्थापित नेते पक्ष प्रवेशासाठी के चंद्रशेखर राव यांच्याकडे भेटीसाठी प्रयत्न करत आहेत.
तेलंगणाचे विकास मॉडेल, शेतकरी आत्महत्येच्या संख्येत झालेली लक्षणीय घट या BRS पक्षाच्या जमेच्या बाजू आहेत. शहरीकरण आणि पायाभूत सुविधा यामध्ये सुद्धा इतर राज्यांच्या तुलनेत तेलंगणा ने आघाडी घेतलेली आहे. नुकतेच फॉक्सकॉंन सारख्या कंपनीने एक लाख प्रत्यक्ष रोजगार देणारा प्लांट तेलंगणा मध्ये सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. हायटेक सिटी च्या माध्यमातुन देशातील सर्वाधिक माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील रोजगार तेलंगणा राज्य देत असल्याचे दिसून येते.
या सर्व बाबी पक्षाच्या विधानसभा मतदारसंघ प्रतिनिधींनी लोकांमधे जाऊन सांगाव्यात. तेलंगणा विकासाचे मॉडेल म्हणुन उजेडात आणावे यासाठी आजही मीटिंग बोलावण्यात आली आहे. लोकांसमोर BRS हा चांगला राजकीय पक्ष म्हणुन सर्वात पहिला पर्याय असला पाहिजे असेही प्रा विजय मोहिते यानी सांगितले. जमलेल्या प्रतिनिधींनी आपापल्या मतदारसंघात पक्षाची मजबूत बांधणी करून येणार्या प्रत्येक निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी तयार रहायचे आहे. असेही मुंबई (कोकण) विभाग समन्वयक प्रा विजय मोहिते पुढे म्हणाले.
भीष्म कर्ण अन पांडव सारे, एक होऊया चला र... आपल्याच कवितेच्या या ओळी उद्यृक्त करून ज्ञानेश वाकुडकर यानी इतर पक्षात असणार्या चांगल्या व्यक्तिंना साद घातली व के चंद्रशेखर राव यांच्या सोबत भारत राष्ट्र समिति मध्ये काम करण्यासाठी आवाहन केले बीआरएस चे विदर्भ समन्वयक ज्ञानेश वाकुडकर ह्यानी व्यक्त केले.
के चंद्रशेखर राव यांच्या रूपाने अद्वितीय नेतृत्व लाभलेले असून आम आदमी पार्टी चे प्रदेश उपाध्यक्ष पद सोडून मी त्यांच्याकडे आलेलो आहे असे माजी खासदार हरिभाऊ राठोड म्हणाले.
बीआरएस चे एमएलसी व मुख्यमंत्रांचे मुलगी के कविता यांही दिल्ली चे जंतर मंतर येथे आज निषेधर्थ उपोष्ण महिला करीता आरक्षण मिलावे म्हणून संसद मध्ये बिल पारित करनेचे मांगनी केले आहे हया सभेत हया आंदोलन साटी पाटिंबा देनयात आले. बीआरएस चे मुंबई प्रांथाध्यक्ष हेमंतकुमार बद्दी ह्यांनी केंद्र सरकार ला इशारा दिला आहे की कविता ला ई डी मार्फत त्रास दिला तर मुंबई मध्य त्रिवपने आंदोलन करू असे विचार प्रकट केले.
ह्या सभा मध्ये बीआरएस चे मुंबई जनरल सेक्रेटरी बोले शिवराज, जेस्ट नेते संजय निंभालकर, युवा नेते रवींद्र रोकडे, संतोष दोनाकोंडा, भिवंडी चे नेते सिरीपुरम तिरुपती, पत्रकार सिरीमळले श्रीनिवास, ऍड. येळगारी अशोक व इतर प्रतिनिधि उपस्थित होते